माजलगावात ढाबा मालक व मुलावर प्राणघातक हल्ला.एकाची प्रकृती चिंताजनक
जिल्ह्यात रोज मारामारी,गुंडगिरीच्या घटना.

माजलगाव दि.२० (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात गुंडगिरी, मारामारी थैमान घातले असून जिल्ह्यात रोज नवनवीन घटना घडत आहेत.एखादी मारामारी खुनाची घटना संपते ना संपते तोच दुसरी घटना चर्चेला उधाण आणते. अशीच एक घटना माजलगाव मध्ये घडली.
राष्ट्रीय महामार्ग -६१ वरील माजलगाव पाथरी मार्गावर असलेल्या माजलगाव शहरा पासुन ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्र वरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड (५४ वर्षे) रा. मंजरथ रोड माजलगाव यांच्या वर २० एप्रिल रोजीच्या संध्याकाळी ७.३० ढाब्यावर बसलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकांनी बीला च्या कारणाने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ढाबा मालकाचा मुलगा (२२वर्षे) याच्या वर पण हल्ला केल्याची माहिती समजली आहे. दरम्यान अत्यवस्थ महादेव गायकवाड यांना माजलगाव शहरातील डॉ. गिलबिले यांच्या बायपास रोड वर असलेल्या संजीवनी हॉस्पीटल मधे दाखल केले होते. त्यानंतर काही तासाने संजीवनी हॉस्पीटल चे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले प्रथम उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने महादेव गायकवाड यांना त्यावर महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे हलवले. तर मुलगा आशुतोष महादेव गायकवाड यांचे सिटी स्कैन करण्यात आले असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रात्रीच्या मिळाली आहे. प्रकरणी रात्री उशीरा वृत्त फिर्याद दाखल झाली नव्हती त्यामुळे सविस्तर वृत्त हाती आले नाही.जिल्ह्यात रोजच अशा घटना घडत असल्याने पोलिसांची वचक कमी झाली का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे.