बोंबला ! बीड शहरातील पाईपलाईन फुटली.
दुष्काळात तेरावा महिना,मुख्याधिकाऱ्यांनी शहर वाऱ्यावर सोडले.

नगरपालिका मुख्यधिकारी व प्रशासकाच्या आशीर्वादाने बीड शहर तहानलेलेच.
बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील काही भागात नगरपालिकेकडून २२ दिवस झाले तरी पाणी मिळत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे.
बीड शहरातील लोकप्रतिनिधी कडून नगरपालिका निवडणुका लांबल्याने आपल्या भागात दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करावी लागत आहे.गेल्या आठवड्यात काही भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला परंतु पाणी काळे व पाण्याचा दुर्गंध येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. दुर्गंधयुक्त पाणी पिल्याने अनेक रोगांना निमंत्रण होत असून नगरपालिकेने स्वच्छ पाणी देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे. यातच आज दुपारच्या वेळी बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांनी नगरपालिका प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल.
पाण्याचे एक हजार लिटरचे टँकर ४०० रुपये तर २००० लीटर साठी ७०० रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे टँकर चालत असा धंदा तेजीत सुरू आहे. महिन्यातून एकदाच पिण्याचे पाणी मिळत असल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र बीड शहरात पहावयास मिळत आहे.एकीकडे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासकावर नागरीक संताप व्यक्त करत आहेत.