बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची मनमानी.
जळीत महिलेला उपचार न करणाऱ्या गैरहजर डॉक्टरांना निलंबित करा..स्वप्निल वरपे.

बीड दि.१८ (प्रतिनिधी)बीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार ढेपाळला असून डॉक्टर व कर्मचाऱ्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र सध्या शासकीय रुग्णालयात पहावयास मिळत आहे.यामुळे डॉक्टर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे.जिल्हा रुग्णालयातील रुग्नेसवेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
बीड शहरातील पेठ बीड भागातील स्वाती कानडे यांना भाजलेल्या गंभीर अवस्थेत महिला रूग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,परंतु डॉक्टर जळीचा वार्ड मध्ये नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांना कॉल दिले, अनेकवेळा फोन करून देखील डॉक्टर न आल्याने अखेर बीड सिव्हील सर्जन डॉ.राऊत यांना कॉल करून डॉक्टर गैरहजर असल्याची माहिती देण्यात आली.परंतु एकही डॉक्टर त्या ठिकाणी रूग्णाला गंभीर अवस्थेत जखमी महिलेवर उपचार करण्यासाठी आले नाही.शेवटी नातेवाईकांनी त्या महिलेला खाजगी रुग्णालयात घेवुन जावे लागले.मग अशा शासकीय रुग्णालयाचा आणि लाखो रुपयेचा पगार घेणारे डॉक्टरांचा काय उपयोग ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील वरपे यांनी उपस्थित केला आहे.
बीड सिव्हील सर्जन यांनी संबंधित डॉक्टरांना सांगून देखील दखल घेत नसतील तर डॉक्टरांच्या अशा मनमानी कारभारामुळे एखादा रूग्णाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल स्वप्नील वरपे यांनी व्यक्त केला आहे.यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा पगार घेणाऱ्या अश्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे व बीड शासकीय रुग्णालयात सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचे खाजगी रुग्णालय बंद करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वरपे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्याकडे करणार आहेत.