ताज्या घडामोडी

वाहनावरील लेट पासिंग दंड कायदा रद्द

50 रुपये प्रतिदिन दंड आकारला जात होता.

वीर(प्रतिनिधी) उपप्रादेशिक वाहन वाहन कार्यालयामध्ये मालवाहू वाहन,रिक्षा,परमिट टॅक्सी,बस या वाहनावरील टॅक्स भरण्यास जर विलंब झाला तर परवानाधारक वाहनाला प्रतिदिन पन्नास रुपये प्रमाणे दंड आकारला जात होता.हा जुलमी कायदा रद्द करण्यातयावा यासाठी  गेल्या अनेक दिवसापासून रिक्षा चालक-मालक,ट्रान्सपोर्ट चालक-मालक,टॅक्सी,रिक्षा यांनी हा जुलमी कायदा रद्द करण्यासाठी न्यायालय लढाई लढली होती.त्याला यश आले.दर दिवशी परवाना(परमिट)वाहन धारकाला प्रतीदिन 50 रुपये दंड भरावा लागल्याने लाखोंचा दंड भरण्याची नाम उसकी वाहनधारकावर ओढावली होती.दंडाची रक्कम रिक्षा चालकाला भरणे शक्य नसल्याने वाहने पासीगसाठी
येणे कमी होते.या निर्णया विरोधात पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रातील सर्व संघटन लढा दिला होता त्याला यश आले.बाबा कांबळे यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांनच्याकडे मागणी केली होती.ही मागणी मान्य करत वाहनधारकावरील लादलेला जुलमी कायदा रद्द केला.आता पुढील कागदपत्रााची पूर्तता त्वरित करणेेेेे गरजेचे आहे. राज्याने दंड रद्द चां निर्णय घेतला असून आता केंद्राने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सर्व चालक मार्ग संघटनेच्या एकीचा विजय असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button