कृषी मंत्री धनंजय मुंडे/मनोज जरांगे यांची पहाटे भेट !
मनोज जरांगे ओबीसीतून आरक्षणावर ठाम.

आनंद वीरप्रतिनिधी)बीड जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसात जोरदार पाऊस झाल्याने नुकसान झाल्याने,मनोज जरांगे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन करून शेतकऱ्याचे नुकसान व वेदना सांगितल्या व सर्वच शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली होती.त्यानंतर अचानक दि.८ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंतरवाली सराटी या गावी जावून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची भेट घेतली.सरपंचाच्या घरी दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार असून,त्या अगोदर दोघांमधील भेट महत्त्वाची मानली जाते.या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व चर्चा होत आहे.काल परळी मधील गणेश उत्सवाचा मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवाली मध्ये दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून. याबाबत धनंजय मुंडे यांचे अद्यापप्रतिक्रिया आलेली नाही.धनंजय मुंडे यांनी भेटीचा इन्कार केला असला, तरी मनोज जरांगे पाटील यांनी भेटीचा तपशील सांगितला. जरांगे पाटील यांनी सांगितले की,पहाटे तीन वाजता ते आले तेव्हा झोपेत होतो.दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो.आमच्याकडे आयतं मैदान आहे. आम्हाला तयारी करायची गरज नाही, त्यांनी उद्या जरी निवडणूक घेतली तरी तयार असल्याचे ते म्हणाले.मनोज जरांगे म्हणाले की,मी माझ्या मुद्यांवर ठाम असून माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते फक्त ओबीसीतून कायम ठाम असणार आहे. ज्यावेळी आमची आरक्षण संदर्भात चर्चा झाली तेव्हा व्यासपीठावर धनंजय मुंडे सुद्धा होते.घोंगडी बैठक परळीत होत असून आणि ती ताकदीने, होणार असल्याचे ते म्हणाले.त्यांनी पुढे सांगितले की,मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा, कोणत्या महायुतीचा मी नाही.मी फक्त मराठ्यांचा असल्याचे जरांगे म्हणाले.