फडणवीसांचा सुपडा साफ करणार ! जरांगे पाटील
मुख्यमंत्री शिंदेनी मराठा समाजाचा विश्वासघात केला.

आनंद वीर(प्रतिनिधी)आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगे यांनी थेट इशारा देत म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता. मात्र, आता त्यांना मत द्यायची की नाही,हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचा आयुष्य बेचिराख करण्याचं काम केलं आहे.आता फडणवीसांचा सुपडा साफ मराठ्यांच्या पोरांचा आयुष्य उध्वस्त झालं पाहिजे, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात केला. शिंदे सरकार आपल्याला आरक्षण देईल अशी अपेक्षा परंतु मराठा समाजाला गोरगरीब जनतेला होती. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाचा विश्वासघात केला त्यामुळे आता ती अपेक्षा फोल ठरली, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज फडणीस व शिंदे सरकार सुफडा साफ करतील असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.