ताज्या घडामोडी

सुरेश धस जरांगे पाटलांना रात्री भेटतात !

नारायण गडावर मेळाव्यास न येणारे सुरेश धस रात्री भेटीला.

 

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला होता, परंतु बीड जिल्ह्यातील काही मराठा समाजातील मंत्री सुरेश धस सह नेत्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली होती. बीड जिल्ह्यात प्रथमच नारायण गडावर 700 एकर मध्ये  मेळावा झाल्याने मराठा समाजाला आवर्जून होत असते लावली होती. यामध्ये जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. आचारसंहिता लागण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर फडणवीसाचा सुपडासाफ करणार असे नारायण गडावरील दसरा मेळाव्यात सरकारला इशारा दिला होता. याच दसरा मेळाव्याकडे बीड जिल्ह्यातील मराठा नेत्यांची अनुपस्थिती ती त्यामुळे मराठा समाजात त्या नेत्याविषयी रोष व्यक्त होत आहे, मिळवायला न येणाऱ्या मराठा नेत्यांना येत्या विधानसभेत मतदान न करण्याचे व त्या मराठा नेत्यांना पाडणार असल्याचे देखील चर्चा होत आहे.त्यामुळे मराठ्यांचे नेते रात्री अपरात्री म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराठी येथ भेटण्यासाठी जात आहे. आष्टीची सुरुवात दुसरे रात्री एक वाजता मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, या भेटीमागे काय कारण असा प्रश्न पडला आहे.गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील हे जीवाचा रान करत आहेत, नारायण गडावरील मेळाव्याला सुरेश धस सह मराठा नेते दिसले नाही, मराठा नेते मंत्री त्यांना साथ देत नसल्याने मराठा समाजात त्या मंत्र्यां,नेत्या विषयी रोष व्यक्त होत असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नक्कीच झटका बसणार, मराठा समाज त्यांना गुलाब देणार नाही हे देखील तितकेच खरे आहे.

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button