ताज्या घडामोडी

माजी आमदार सुरेश नवले विधानसभेच्या मैदानात.

जरांगे पाटील यांना निवेदन देऊन केली उमेदवारीची मागणी.

वीर(प्रतिनिधी)बीड चे माजी आमदार सुरेश नवले यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन बीड विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. सुरेश नवले यांनी पार्श्वभूमी लाईव्ह मध्ये मुलाखत देताना क्षीरसागर कुटुंबावर गंभीर आरोप करत बीडचा विकास शिरसागर मुळेच खुंटला असल्याचे सांगितले.सध्या पावसाळा असून देखील बीड शहराला 15 दिवसाला पाणी मिळत आहे, मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत, कचऱ्याचा प्रश्न तर भयंकर असून त्याकडे नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंगू सारखे रोग होत आहेत.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे फक्त परळी चे पालकमंत्री असल्याचे दिसत आहे कारण जिल्हा नियोजन समिती मधील जिल्ह्यासाठी येणाऱ्या निधी हा समप्रमाणात वाटप होत नसून केवळ स्वतःच्या मतदार संघात वापर होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचां विकासा पासून वंचित राहिला आहे. धनंजय मुंडे हे आपल्या मर्जीतील लोकांनाच निधी वाटप करत असल्याचा आरोप माजी आमदार सुरेश नवले यांनी केला.विद्यमान आमदार यांना बीडची मतदार जनता येत्या विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवणार आहे. बीडची जनता क्षीरसागर कुटुंबीयांना कंटाळली असून त्यामुळे क्षीरसागर मुक्त बीड होणार आहे असे देखील ठामपणे सांगितले. त्यामुळे येत्या निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या राजकारणात नक्कीच बदल होणार असे चित्र दिसत आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button