ताज्या घडामोडी

जरांगे पाटील या तारखेला उमेदवार जाहीर करणार !

मराठा,दलित,मुस्लिम समीकरण जुळले.निवडणूक लढवणारच

वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकी मध्ये इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची सांगितल्याने मराठा समाजातील उमेदवारांनी अर्ज केले होते.फक्त मराठा समाजाच्या मतावरच कोणताही उमेदवाराचा विजय होणार नसल्याने मनोज जरांगे यांनी मराठा,दलित आणि मुस्लिम यांचे समीकरण जुळवले आहेत.या समीकरणातूनच आता सत्ता परिवर्तन होणार,अशी घोषणा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीनंतर केली. बैठकीस मुस्लिम, दलित समाजातील धर्मगुरू आणि नेत्यांची उपस्थिती होती. जरांगे यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जरांगे पुढे म्हणाले,मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता ३ तारखेला कोणत्या जागी कोणता उमेदवार हे ठरले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे असा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला. मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाज देखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. ‘मी फडणवीस यांना सांगितलं होत, गोरगरिबांना हलक्यात घेऊ नका’, या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दहशतीतून मराठा समाज आझाद करायचा आहे.माझी मान जरी कापली तरी मी निवडणूक लढणार असे सांगितले. त्यामुळे जरांगेेेेेे पाटील यांची उमेदवार येत्या विधानसभा निवडणूक लढणार हे निश्चित झालेेे आहे.

 

 

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button