ठरल ! जरांगे पाटलांचे उमेदवार लढणारच.
कुठे उमेदवार द्यायचे,कुठे पाठिंबा व कुठे पाडायचे आजच्या बैठकीत निर्णय होणार.

आनंद वीर( प्रतिनिधी) मागच्या काही दिवसांपासून कोणत्या जागा लढायच्या आणि कुणाला पाठिंबा द्यायचा ? यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चा सुरु होती. मात्र अखेर याबाबत काही निर्णय घेण्यात आले असून विधानसभा व राखीव मतदारसंघ लढण्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत.विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कुठे उभे करायचे आणि राखीव मतदारसंघांमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा ? याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे विचार मंथन सुरु होते. आणि आता उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवाटचा दिवस असल्याने आज आंतरवाली सराटी येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे इच्छुक उमेदवाराना बोलवण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघ लढवण्याचे संकेत दिले आहेत.दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची अनेक वेळा भेट घेतलेली असून आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी विनंती केलेली आहे. कोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचे, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा व कोणत्या मतदारसंघात उमेदवार पाडायचे हे आज ठरणार आहे.मात्र जरांगे पाटलाचे इच्छुक उमेदवारांनी विधानसभा मतदारसंघ लढवण्याचे निश्चित जरी केलेले असले तरी पाटलांचा आदेश अंतिम राहील असे बोलले जात आहे.बीड मतदारसंघात जरांगे पाटील नेमका कोण कोणते उमेदवार देतात त्यांची नावे सायंकाळपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाठिंबा मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेले विधानसभा मतदारसंघातील सर्वच इच्छुक उमेदवार अंतरवाली सराटी येथे तळ ठोकून आहेत.मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बीड विधानसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित झाले आहे.