धक्कादायक ! दोन कोटीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण कसे केले पहा !
सोने,रोख रक्कम दिल्याने व्यापाऱ्याची सुटका.

परळी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून केल्याची घटना घडली असतानाही परळी येथेही २ कोटीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करा म्हणून जमाव परळी येथे पोलीस ठाण्यात जमल्याचे जमा झाले होते. परळी शहरातील विकास दुबे असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, काल रात्री परळी शहरातून अपहरण करुन कन्हेरवाडी घाटात घेऊन गेले. तेथून विकास दुबे यांच्या मोबाईलवरून फोन करुन नातेवाईकांना धमकी देत पैशांची मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. घाबरलेल्या नातेवाईकांनी तीन लाख रोख आणि काही सोनं दिल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस चालढकल करीत असल्याने आज मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता.याबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे.नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना दुबे यांच्या मोटरसायकलला कार आडवी लावून अज्ञात पाच ते सहा जणांनी त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले. व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले.दरम्यान, त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो,असे त्यांना सांगण्या आले. घाबरून जाऊन अमोल डुबे यांनी गळ्यातील सोन्याची चैन, जवळील रक्कम व आपल्या ड्रायव्हरला फोन लावून काही रक्कम आणून अपहरणकर्त्यांना दिली. त्यानंतर अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेच्या पुढे गेल्यानंतर या अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून देऊन ते पसार झाले. चार ते पाच जण तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आले होते. अपहरणाची घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. परंतु, या घटनेने व्यापारी व परळी शहरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.दुबे यांनी अपहरण केलेल्याना पैसे,सोने दिल्याने त्यांना सोडून देण्यात आले.मस्साजोगचे सरपंच देशुमख यांचे दिवसा ढवळ्या आपण करून खून करण्यात आला ही घटना ताजी असतानाच परळी शहरात विकास दुबे या व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याने बीड जिल्हा हादरला असून पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसत आहे.