सरपंच देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हा बंद !
चार दिवसानंतर देखील आरोपीचा शोध बीड पोलीस लागेना.?

पवनचक्की अधिकाऱ्याला खंडणी व मारहाण प्रकरणी मध्यस्थी केलेल्या सरपंचांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती.पवनचक्कीचा वाद एवढ्या टोकाला जाईन अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती.मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली. देशमुख यांना मानव जातीला लाजवेल अशा एवढ्या क्रूरतेने मारले होते. या घटनेचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटले असून पोलिसाविषयी तीव्र रोष बीड जिल्ह्यातील नागरिक व राजकीय प्रतिनिधी यांनी व्यक्त केला. वेळी जर प्रतिबंधक कारवाया केल्या असत्यात तर कदाचित हत्येची ही घटना टळली असती. या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतली असून इतर आरोपी मात्र फरार आहेत. यातील आरोपींना तत्काळ अटक करावी,या हत्तीचा तपास सीबीआय कडे द्यावा, या अपहरणाचा प्रत्यक्षदर्शी व देशमुख कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, या हत्या संबंधित आरोपी व पोलिसांचे कॉल डिटेल तपासून यामागील मुख्य सूत्रधाराला अटक करून, पोलीस व या मागील सूत्रधार यांना सह आरोपी करावे अशी मागणी केली. पोलीस अधीक्षक यांनी तीन दिवसाच्या आत आरोपींना अटक करण्याची आश्वासन दिले होते,परंतु तीन दिवस उरटले तरीही बीड पोलीस यांना आरोपीचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली.बीड सह वडवणी, पाटोदा,परळी, चौसाळा, गेवराई, आंबेजोगाई, आष्टी, केज मध्ये कडकडीत बंद पाण्यात आला.आज सकाळीच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील व्यापाऱ्यांना आपले दुकान, व्यवसाय बंद ठेवून बीड बंद मध्ये सामील व्हावे असे आव्हान केले होत. त्यामुळे व्यापारने आपले दुकान बंद ठेवून बीड शहर बंदला प्रतिसाद दिला.