ताज्या घडामोडी

वाल्मीक कराड प्रकरणात माझा संबंध नाही..आ.धनंजय मुंडे

मी राजीनामा का देऊ?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळे अपहरण व निघृण हत्या झाल्यानंतर हे प्रकरण बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या हत्येचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता. हे प्रकरण पवनचक्की खंडणीच्या वादातून झाल्याचे कारण समोर आल्याने यातील महत्वाचा आरोपी वाल्मिक कराड हा २० दिवस फरार होता. परंतु दोन दिवसांपूर्वी तो पुणे सीआयडींना शरण आला आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव येऊ शकत असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करीत आहे. हा तपास सुरु असेपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्याने आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात चौथा आरोपींना आधीच अटक झाली आहे तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात बाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटचे असल्याने तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे. या हत्येचा तपास योग्य दिशेने होत असून, एसआयटी मार्फत देखील चौकशी केली जाणार आहे तसेच न्यायालयीन तपास देखील होणार आहे त्यामुळे आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याची मागणी आपणच विधीमंडळात सर्वप्रथम केली होती असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून मागणी केली आहे. जी विरोधकाची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. त्यामुळे माझा राजीनामा का देऊ असे धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांश बोलताना सांगितले.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button