वाल्मीक कराडने केली शेतकऱ्यांची ११ कोटी रुपयांची फसवणूक ?
वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होणार.१९ शेतकऱ्यानी केले तक्रार अर्ज दाखल.

मस्साजोग येथील आवादा पवनचक्की अधिकाऱ्याकडून 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड सीआयडीच्या ताब्यात आहेत. वाल्मीक कराडची उद्या सीआयडी कोठडी संपणार असून यातच आता वाल्मिक कराड यांनी ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन अनुदान मिळवून देतो म्हणून शेतकऱ्यांची अकरा कोटी वीस लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत काल रात्री उशिरा पंढरपूर परिसरातील फसवणूक झालेल्या १९ मशीन मालक शेतकऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले असून त्यांच्याकडून तक्रारी अर्ज दाखल केले आहेत.आता या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असून या ११ कोटी २० लाखाची फसवणूक झालेल्या सर्व मशीनधारकांना त्यांच्या जवळील पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. यातील तथ्य तपासून पुढील दोन दिवसात वाल्मिक कराड, जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. १४० जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार : ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या राज्यातील जवळपास १४० शेतकरी मशीन श्रीकांत नागणे, दिलीप नागणे यांच्यासह १९ जणांचे प्रत्येकी आठ लाख रुपये दिल्याचे सांगितले असून याबाबत पण घरी तील हॉटेलमध्ये पैसे मोजून देताना चे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. त्यामुळे आता वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यातील एका फोटोत जितेंद्र पालवे हा पैसे मोजून घेताना दिसत असल्याचा दावा तक्रारदारांचा आहे. या तक्रारदारांकडे प्रत्येक नोटीचे नंबर आणि व्हिडिओ देखील असून अनेकांनी कर्ज काढून आणि सावकाराच्या माध्यमातून हे पैसे उभा केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचण सापडला असून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.
शेतकऱ्यांना ३६ लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्येकी आठ लाख रुपये देण्यास सांगितले होते. तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्ती असून आम्ही तुम्हाला हे अनुदान मिळवून देतो, असे सांगत या सर्व १४० जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. यासाठी १४ सप्टेंबर २०२४ रोजी धनंजय मुंडे यांची वाल्मिक कराड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घडवून आणल्याचा गोप्यस्फोटही या तक्रारदारांनी केला आहे. यावेळी मुंडेंनीही आश्वासन दिल्याचा दावा या शेतकऱ्यांचा आहे.या सर्व शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तवण्यात यत आहे .मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवरून तपास केला असून राज्यातील विविध भागातील हे तक्रारदार असल्याने आता राज्यात अनेक ठिकाणी हे तक्रारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. या प्रकाराची व्याप्ती मोठी असून या त अनेक जण सामील असल्याने याचा वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्र्यांनी तपास करावा, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस आणि मनोज दादा जरांगे यांच्याही कानावर हा सर्व प्रकार घातला असून आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.