नगरपालिकेला आली अचानक जाग,शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात.
गाडे,टपऱ्या हटवल्या शहरातील सरसकट अनधिकृत अतिक्रमणे काढावे.

बीड (प्रतिनिधी)-नागरिकांना वेळेवर पाणी न देण्यापासून सर्वच ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले नगरपालिका बीड नगरपालिका प्रशासन आज अचानक जागे झाले आणि सकाळी सकाळी शहरातील नगर रोड, जालना रोडवर या मुख्य रस्त्यावर थाटलेल्या टपर्या, पत्र्याचे शेडवर जेसीबीच्या सहाय्याने कार्यवाही करुन रस्ते मोकळे केले त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला मात्र नगरपालिकेने केलेल्या या कार्यवाहीने नागरिक मात्र अवाक झाले होते.
आज सकाळपासूनच शहरातील नगर रोडवरील एलआयसी ऑफीस,जालना रोड,बस स्टॅड समोरील दुकानदारांची पुढे आलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली यामध्ये दुकाने, टपर्या, शेड, गाडे रस्त्यालगत लावल्यामुळे वाहत कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता.ते जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले.
नव्याने होत असलेला बीड-अहिल्यानगर हा रस्ता अतिक्रमणाने पुन्हा व्यापू लागला होता परंतू आज नगरपालिकेने कार्यवाही केल्याने तो रस्ता मोकळा दिसू लागला होता त्यामुळे पालिकेने केलेल्या या अतिक्रमणाच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांत समाधान दिसू लागले आहे.मात्र बीड शहरातील अनधिकृत बिल्डिंग्स, हॉटेल्सवर कारवाई करावी.
अतिक्रमण होवूच नये यासाठी पथक नियुक्ती करुन बीड नगरपालिकेने नजर ठेवणे ठेवून वेळोवेळी कारवाई करणे आवश्यक.
बीड नगरपालिकेने या अगोदरही अनेकदा अशी कार्यवाही केलेली आहे परंतू पहिले पाढे पंचावन्न होते म्हणजे काही दिवस उलटले की पुन्हा टपर्या, शेड, मुख्य रस्त्यावर उभी राहतात त्यामुळे एखादे पथक नियुक्ती करुन नजर ठेवणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे. बीड शहरातील हातगाडे,टपऱ्या, पत्र्याचे शेड हटवल्याने जनतेतून स्वागत होत आहे मात्र फक्त गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्यावर कारवाई केल्याचे बोलले जात असून, मोठ्या वर कारवाई कधी करणार अशी चर्चा छोटे व्यावसायिक करत होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका,तेलगाव नाका, दूध डेरी परिसरातील अतिक्रमणे काढावी अशी देखील मागणी होत आहे. बीड नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी कर्मचारी यांनी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला.