वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहितेचा मृतदेह आढळला विहिरीत !
मुलीचा खून करून विहिरीत टाकल्याचा नातेवाईकांचा आरोप.

पुण्यातील वैष्णवी हगवणे छळ आणि मृत्यू प्रकरणाने अवघा महाराष्ट्र एकीकडे हादरून गेलेला असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातही विवाहितेंचा छळ होत असल्याच्या कारणाने त्या मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडत आहेत.
गेल्या आठवडाभरापूर्वी अंबेजोगाई तालुक्यात शोभा शिंदे या महिलाच्या छळ प्रकरणाने बीड जिल्ह्याला हादरून सोडले होते तर काल आष्टी तालुक्यातील महिलेने आत्महत्या केली. ती घटना ताजी असतानाच वटपौर्णिमेच्या पूर्व संध्येला गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील विवाहिता वर्षा ओमप्रकाश लाटे(वय 32 वर्ष) या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने सासरकडील मंडळींनी घातपात केल्याचा आरोप वर्षाच्या आई-वडिलांनी केला आहे.
मृत विवाहितेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असून सासरच्या लोकांनी तिला मारून विहिरीत टाकले असा आरोप माहेर च्या लोकांकडून करण्यात येत आहे. विवाहितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
एका महिलेसोबत काम करण्यासाठी आली मात्र त्या महिलेला मी घरी जात आहे. असे सांगून वर्षा शेतातून निघून गेली दुपारनंतर वर्षा शेतात आणि घरी नसल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला मात्र ती मिळून येत नव्हती सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान लाटे यांच्या शेतातील विहिरीजवळ वर्षा हिचा स्कार्फ दिसून आला त्यामुळे ती विहिरीत असावी म्हणून विहिरीत शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचा मृतदेह विहिरीत असल्याचे काहींच्या लक्षात आले तोपर्यंत तिचे माहेर असलेल्या ईटकुर येथल नातेवाईक घटनास्थळावर आले जोपर्यंत पोलिस घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह काढला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली शेवटी गेवराई पोलीस त्या ठिकाणी डेरे दाखल झाली पोलिसांच्या उपस्थितीत रात्री वर्षाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वर्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आज सकाळी जेव्हा नातेवाईकांनी तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. गळ्यावर, पायावर, यासह अन्य काही भागांवर मारहाणीच्या खुणा होत्या आमच्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेह सासरच्या लोकांनी विहिरीत टाकला असा आरोप वर्षाच्या माहेरच्या लोकांनी केला. असून सासरच्या लोकांन विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत गुन्हेगारांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा होऊन जिल्हा रुग्णालयात नातेवाईक जमा झाले असून आक्रमक झाले होते.