
अंबाजोगाई – लग्न समारंभासाठी कारने जात असताना अंबाजोगाई आडस रोडवरील उमराई पाटी जवळ आली असता दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात पलटी झाली. या अपघातात 3 ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी घडली.
माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून एम एच 05 सी व्ही 9186 या क्रमांकाच्या कारमधून अंबाजोगाईकडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक कुटुंब जात होते. आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटी जवळ असलेल्या दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आला. या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जागीच पलटी झाली.1)यात शौकत अहमद शेख वय 46 वर्ष 2) खय्युम अब्बास अत्तार वय 45 वर्ष,3) शामू जागीरदार हे दोघे जागीच ठार झाले. तर आरेफ जागीरदार, नवाब मिया शेख,वाजेद आबेद मोमीन,खाजा अमीर शेख,शरीफ इस्माईल मोमीन हे 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अपघातानंतर दुचाकी स्वार दुचाकीसह घटनास्थळावरून पसार झाला असून जखमींची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळतात पाथरूड गावावर शोककळा पसरली आहे.