सरपंच देशमुख हत्या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी.
विधीतज्ञ उज्वल निकम उपस्थित राहणार.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या अपहरण करून अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली होती.देशमुख यांची निघृण हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकात संताप व्यक्त करत महाराष्ट्रात या हत्येचा निषेध करून आरोपींना अटक करून फाशी देण्यात यावी यासाठी मोर्चे काढण्यात आले होते.
सरपंच देशमुख यांची हत्या पवनचक्की खंडणी वादातून झाल्याचे पोलीस अहवाला स्पष्ट झाल्याने यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सह इतर आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत.या सर्व आरोपीवर खंडणी, मारहाण व हत्या कलमाखाली गुन्हे दाखल झाल्याने आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम ज्यांच्याकडे ही केस वर्ग करावी अशी मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य करून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती.
वाल्मीक करा व विष्णू चाटे यांनी या हत्या प्रकरणातून दोष मुक्त करावी अशी मागणीचा अर्ज न्यायालयात केला होती, परंतु विष्णू चाटे यांने हा अर्ज माघारी घेतला आहे.व लातूर कारागृहातून बीड कारागृहात आणण्यात यावे असा देखील अर्ज केला आहे. यावर न्यायालय काय आदेश देणार हे स्पष्ट होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने त्याची सुनावणी आज दुपारी बीड न्यायालयात होणार असून या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अवघ्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणी कडे लागली आहे.