“क्या हुवा तेरा वादा”? म्हणत शिवसैनिकांनी महामार्ग रोखला.
शेतकऱ्याची,जनसामान्यांची फसवणूक करणारे सरकार-उल्हास गिराम

बीड : (प्रतिनिधी) महायुती सरकार जन सामान्यांची फसवणूक करून सत्तेवर आले आहे. निवडणुकी पूर्वी जी आश्वासने दिली त्याला तिलांजली देऊन, हे फसवे सरकार स्थापन झाले आहे. या आघाडी सरकारला त्यांच्याच फसव्या घोषणाची आठवण करून देण्यासाठी आज विधानपरिषदे चे विरोधी पक्ष नेते आंबादासजी दानवे यांच्या आदेशानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक व शेतकऱ्यांनी आज बीड शहर बायपास वरील महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन केले.
शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करून, शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा, लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकविशे देणार, शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देऊन प्रत्यक्ष खात्यावर नुकसान भरपाई देणार, वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये देणार होते, शेतीला चोवीस तास विज, हर घर जल – हर घर छत या सारख्या शेकडो फसव्या घोषणा करून सामान्य जनता, महिला, शेतकऱ्यांची दिशाभूल करून हे सरकार सत्तेवर आले.
या सरकारला त्यांच्याच घोषणाची जाणीव करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी शिवसैनिक, शेतकरी व महिलांना एकत्रित करत बीड शहर बायपास, महालक्ष्मी चौक या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको करून जन आंदोलन केले.
यावेळी महिला जिल्हा संघटक मीराताई नवले, सोपान काका मोरे तालुका प्रमुख शिरूर, मुकुंद शिंदे तालुकाप्रमुख पाटोदा, अजय दाभाडे बबलू दिवे तालुकाप्रमुख गेवराई,संजय महाद्वार ,हनुमान जगताप, सुशील पिंगळे, राजू मोहाले, रतन गुजर, दीपक बाप्पा मोरया, अशोक हिरडे, अशोक जाधव, कृष्णा चौरे, तात्या रोडे, पंकज कुटे, अजिंक्य डोरले, रवी वाघमारे, प्रदीप कोठुळे, नयुब पठाण, दादासाहेब सोनवणे, मशरू पठाण, महादेव परस्कार, अक्षय काशीद, राम अंतापुरकर, बाळू वैद्य, सतीश मस्के, रमेश सुरवसे, सखाराम कोरडे, मच्छिंद्र काळे, हनुमान काशीद, चंदूनाना कागदे, गोविंद शिंदे, विशाल पवार, बाळासाहेब लांडे, अशोक चव्हाण, विकास कदम, नितीन कुठे, शिंदे रावसाहेब, गणेश लोणकर, सतीश परदेशी, दिलीप पवार, रंगनाथ पैठणकर, नारायण काशीद, संतोष काशीद, बाळासाहेब, प्रतीक वाघमारे मारुती वाघचौरे, दाऊद शेख, शरद पवार, राजू गोपाळ, आदी शिवसैनिक उपस्थित होते.