शेतीच्या बांधावरुन भावकीत जोरदार राडा.व्हिडीओ व्हायरल.
शेताच्या बांधावरून मारहाणीत चौघे जखमी.

बीड दि. १८ (प्रतिनिधी):- पोलीस प्रशासनाने शेतीच्या बांधावरून होणारे वाद मिटविण्यासाठी पाऊल उचलले असले तरी शेती वरून भावकीतील वाद अजुनही सुरुच आहेत.मागील आठवड्यात घाटसावळी शिवारात शेतीच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता,ही घटना ताजी असतानाच पुन्हा पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतील आंबेसावळीत बुधवारी दुपारी शेताच्या बांधावरून भावकीत तुफान राडा झाला. यामध्ये लाठ्याकाठ्या आणि दगडाने जबर मारहाण झाल्याने चौघे जण जखमी झाले आहेत. सदरील मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेसावळी येथे शेतीच्या वादावरुन भावकीत मोठा वाद झाल्याची घटना बुधवारी घडली. अण्णा प्रभू निसर्गध हे पुण्यात राहत असून त्यांचं मूळ गावं आंबेसावली आहे गावाकडे आल्यावर शेताच्या बांधावरून त्यांनी व पत्नी,मेव्हणा व इतरांनी तात्याराव लक्ष्मण निसर्गंध यांच्यासह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विनोद तात्या निसर्गंध,प्रशांत तात्याराम निसर्गंध,कांताबाई तात्याराम निसर्गंध यांना भावकीतीलच जबर मारहाण झाली असून उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमीवर उपचार सुरू आहेत.