सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली.
वाढदिवसानिमित्त वाल्मिक कराडचे फोटो बॅनरवर झळकल्याने संताप.

मस्साजोग सरपंच देशमुख यांच्या हत्येला सहा महिने उलटून देखील यातील आरोप कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता,या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी सध्या बीड जि असून याने या दोषआरोपा मधून मला दोषमुक्त करावे असा अर्ज वाल्मीक कराडच्या वकिलाने न्यायालयात केला होता त्या सुनावणीसह विष्णू चाटेने लातूर कारागृहातील बीड कारागृहात आणण्यासाठी अर्ज केला होता, वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण् सुनावणी देखील आज न्यायालयात होणार होती परंतु न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ही सुनावण २४ जून रोजी होणार आहे.
बीड शहरात राष्ट्रवादीच्या एकाच्या वाढदिवसानिमित्त देशमुख हत्यांमध्ये मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड चे फोटो बॅनरवर झळकल्याने याची चर्चा जिल्हाभर होत असून पोलीस प्रशासन किती निर्भीस्त आहे.याचे हे उत्तम उदाहरण पहावयास मिळाले. यामुळे वाढदिवसानिमित्त बॅनर लावणारा वर व पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त होत असून बॅनर फोटो लावणाऱ्याच्या घरातील व्यक्ती सोबत असे झाले असेल तर फोटो लावले असते का? असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला. पोलिसांनी या आरोपीची शहरातून धिंड काढली असती तर बॅनर वर फोटो लावायची हिंमत झाली नसती असे देखील धनंजय देशमुख यांनी प्रसारमध्यमा समोर बोलताना खंत व्यक्बीते केली. जिल्हा कारागृहात असलेले आरोपीला वेगवेगळ्या कारागृहात ठेवावे अशी देखील मागणी धनंजय देशमुख यांनी न्यायालयात अर्ज केली आहे.
देशमुख हत्येतील आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी, सहा महिन्यापासून फरार कृष्णा आंधळेला अटक करण्यात यावी, कृष्णा आंधळे पासून देशमुख कटुंबीयांना धोका त्याची देखील भीती धनंजय देशमुख यांना व्यक्त केली.यामुळे मस्साजोग येथील गावकरी हे उपोषणाच्या तयारीत आहेत.